Sunday, 2 June 2013

हिवरे बाजार

गाव- हिवरे बाजार
जिल्हा अहमदनगर
जिल्हा उपविभाग अहमदनगर
तालुकाअहमदनगर
मुख्यालयनगर 

हिवरे बाजार हे गाव नगर तालुका अहमदनगर जिल्हा मधील आहे.
हिवरे बाजार हे गाव इतिहासात प्रसिद्ध होतं. हिवरेबाजारचे संदर्भ आपल्याला इतिहासातही सापडतात. पेशवेकालीन खाणाखुणा गावाने आजही जपल्यायत. पण त्याहीआधी गाव प्रसिद्ध होतं ते घोड्यांच्या बाजारासाठी. या गावाची गोष्ट शिवाजी महाराजांच्या काळापासून सुरू होते. महाराजांच्या अखत्यारित असणाऱ्या जुन्नर परगाणा भागाचं शेवटचं गाव म्हणजे हिवरे गाव. गावात पूर्वी प्राण्यांचा बाजार भरायचा. घोडे आणि हत्तींची खरेदी व्हायची. शिवाय गावाला लागूनच निजामशाही साम्राज्य होतं. हिवरेबाजारात तेव्हा दूधदुभतं होतं. त्यामुळे इथे पट्टीचे पहेलवान तयार होऊ लागले.
१९७२ च्या दुष्काळानंतर ज्वारी आणि बाजरी हीच गावातली मुख्य पिकं होती. ९५ टक्के लोक दारिद्र्य रेषेच्या खाली होते. गावात पावसाचं प्रमाण २०० ते ४०० मि.मी होतं. गावातले लोक ४ महिन्यांसाठी स्थलांतर करू लागले. गावात सावकाराचं राज्य आलं. कालांतरानं दुधाची जागा दारुनं घेतली. दारुनं गावात धिंगाणा आणि मारामाऱ्या आणल्या. दारूमुळे गावात चोऱ्या होऊ लागल्या.
हिवरे बाजार हे गाव १९८९ पासुन सुधारण्यासाठी उभे राहीले. सरपंच पोपटराव पवार यांच्या सहभागामुळे यशस्वी झाला. ९० ते ९५ ग्रामविकासाचा आराखडा तयार झाला. पण गावाला हवी असलेली पिकं, पिण्यासाठी पाणी आणि शेतीतून रोजगार कुठून मिळणार? याला उत्तर होतं. जलसंधारण, मग जलसंधारणाचं नियोजन करून गावात पहिलं पाणी आणलं. समपातळी चर, कुरण विकास, रोजगारही मिळाला पाणीही मिळाले.
लोकसहभाग आणि सामूहिक श्रमदानाच्या माध्यमातून जलसंधारणाचे बहुमोल कार्य करून, देशाच्या नकाशात आदर्श गावाची दखल घेण्यास भाग पाडणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजार ग्रामपंचायतीस २००९ चा प्रतिष्ठेचा वसंतराव नाईक सामाईक पुरस्कार जाहीर झाला.

Sunday, 26 May 2013

सलाबतखानाची कबर (चांदबिबीचा महाल)



अहमदनगर हे अहमदशाह बादशहाने वसविलेले नगर. त्या नगराला पाचशे वर्षांचा इतिहास आहे. या शहरापासून पूर्वेला दहा किलोमीटर दूर, अहमदनगर-पाथर्डी रस्त्यावर ९०० फूट उंचीच्या शाह डोंगरावर (खरे तर टेकडीवर) चांदबिबीचा महाल या नावाने ओळखली जाणारी एक अष्टकोनी वास्तू आहे. सुमारे साडेचारशे वर्षांपूर्वीचा हा ७० फूट उंचीचा, तीन मजली चिरेबंदी व अष्टकोनी महाल. त्याच्या जमिनीखाली एक तळमजला आहे. इमारतीच्या भिंतींना तिरप्या फटी असल्याने दिवसभर या इमारतीत सूर्याची किरणे पोचतात. सलाबतखाने १५८० मध्ये हा तीन मजली महाल बांधला. अहमदनगर शहरात खापरी नळातून यानेच पाणी आणले.

लोक गैरसमजुतीने या वास्तूला चांदबिबीचा महाल म्हणत असले, तरी ही दुसऱ्या सलाबतखानाची कबर आहे. हा सलाबतखान हा इसवी सनाच्या १५५५ मध्ये गादीवर आलेला चौथा निजाम, मूर्तजा याचा वजीर होता. वेडसर मूर्तजाने त्याच्या चंगीजखान या वजिराला संशयावरून मृत्युदंड दिला, आणि त्याच्या जागी १५७९ मध्ये सलाबतखानची नेमणूक केली होती.

Monday, 20 May 2013

महात्मा फुले कृषि विद्यापीठ



महाराष्ट्र कृषि विद्यापीठ राहुरी येथे २९ मार्च १९६८ साली स्थापन करण्यात आले आणि महाराष्ट्रातील थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांचे नाव नंतर याला देण्यात आले. ऑक्टोबर १९६९ पासून कृषि विद्यापीठ कामकाज सुरु झाले.


महात्मा फुले कृषि विद्यापीठ नगर - मनमाड रोड लगत अहमदनगर पासुन ३५ कि.मी. अंतरावर स्थित आहे, तसेच परिसरातील राहुरी स्टेशन पासुन १० कि.मी आणि मनमाड रेल्वे जंक्शन पासून ११० कि.मी. आहे.

महात्मा फुले कृषि विद्यापीठाने शेतीचे प्रगत शिक्षण देणे, संशोधन आणि शेतकऱ्यांना प्रगत शेतीचे प्रशिक्षण देणे या गोष्टीवर मुख्य लक्ष केंद्रित केले आहे. राज्यात चार कृषी विद्यापीठे आहेत. त्यातील महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात पश्चिमी महाराष्ट्रातील दहा जिल्हे आहेत.

 महात्मा फुले कृषि विद्यापीठात कॄषी आणि कृषी इंजीनियरिंग हे दोन भाग आहे. दोन्ही भागात स्नातक आणि स्नातकोत्तर अभ्यासक्रम उपलब्ध आहे. कृषि विद्यापीठात माळी प्रशिक्षण, पशुधन पर्यवेक्षक प्रशिक्षण असे इतरही प्रशिक्षण दिले जाते.

महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे अनुसंधान केद्रे हे वेगवेगळ्या जलवायु क्षेत्रात परलेले आहे. विद्यापीठातील २३ अनुसंधान स्टेशन, ४ राज्यस्तरिय विशेषज्ञ आणि १६ अनुसंधान केद्र हे चार वेगवेगळ्या कॄषी जलवायु क्षेत्रात स्थित आहेत.

Friday, 17 May 2013

राळेगण सिद्धी



राळेगण सिद्धी  हे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तलुक्यातील गाव आहे . हे गाव पुण्यापासून ८७ किलोमिटर स्थित असून गाव ९८२.३१ हेक्टर क्षेत्रात परलेले  आहे. गाव पर्यावरण संरक्षण क्षेत्रातील एक उत्कृष्ट प्रतिकृती म्हणून ओळखले जाते. गावात वृक्षारोपणाचे कार्यक्रम राबलेले आहेत तसेच जामिनीचा ऱ्हास कमी करण्यासाठी आणि पावसाचे पाण्याचा निचरा जमिनीत करण्यासाठी शेतांची शिडीदार रचना करण्यात आली आहे. गावात विजनिर्मिती साठी सौर उर्जी, बायोगॅस आणि पवनचक्की या नैसर्गिक उर्जा स्त्रोताचा वापर केला आहे. गावची सर्वात मोठी उपलब्धी तेथील गैर पंरपरागत ऊर्जा स्त्रोताचा वापर होय. उदाहरणार्थ, गावातील सर्व रस्तांवर बसवण्यात आलेले बल्ब हे वेगवेगळ्या सौर पैनलने चालतात.
गावचे सरपंच हेच ग्राम पंचायत अध्यक्ष आहेत. २००१ च्या जणगणेनुसार गावची लोकसंख्या २३०६ (पुरुष १२६५ आणि स्त्रींया १०४१ ) असून गावात ३९४ कुटुंब आहेत.

१९७५ साली गाव पाणी टंचाईने ग्रासलेला होता. गावात मोठ्या प्रमाणात गरीबी  तसेच अवैध दारुचा व्यापार चालत असे. गावातील तटबंदी बांध त्यात पडलेल्या भेगांमुळे निकामी झाले होते. अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली गावकऱ्यांनी श्रमदान करुन बांध दुरुस्त करुन घेतले त्यामुळे एका उन्हाळ्यात गावातील सात विहीरींचे पाणी प्रथमच आपेक्षे पेक्षा जास्त होते.

आता गावात पाणी टंचाईची समस्या नाही तसेच गावात एक धान्य साठा, एक दुध केंद्र आणि एक शाळा आहे त्यामुळे गावात कोणीही दारिद्ररेषेखाली नाही.

ग्रामस्थांच्या सहकार चळवळीद्वारे राळेगण सिद्धी या गावाचा कायापालट घडला आहे. स्वच्छता, पाणी व्यस्थापन व सामाजिक सलोखा यावर महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठसमाजसेवक, अण्णा हजारे यांनी भर दिला होता व हा बदल घडवून आणला. या कामाबद्दल गावाला अनेक पारितोषिके मिळाली आहेत. विश्व बैंकेने काढलेल्या एका निषर्कशात गावातील सहकार धोरणामुळे मागील २५ वर्षात स्थानिक अर्थव्यवथेत अमुलाग्र बदल घडुन आला आहे.

आजही देशभरातून या गावाची भरभराट कशी झाली हे जाणून घेण्यासाठी लोकांची रीघ लागलेली असते.

Wednesday, 15 May 2013

कळसुबाई शिखर



कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर जिल्हातील अकोले तालुक्यात असणाऱ्या सह्याद्री पर्वत रांगेत आहे. याचि उंची सुमारे १६४६ मीटर आहे. शिखरापर्यंत पोहचण्यासाठी ट्रेकिंग मार्ग आणि पादचारी रस्ते आहेत. शिखरावर जाण्याचा मुख्य रस्ता भंडारदऱ्यापासून ६ कि. मी. असणाऱ्या बारी या गावापासून सुरु होतो.  नाशिक-इगतपुरी महामार्गावरील घोटी या गावापासून घोटी -भंडारदरा रस्त्याने गेल्यास  बारी हे गाव लागते. इगतपुरी मधुन पहाटे ५.०० वाजता बारी तसेच पुण्याच्या दिशेने वाहने जातात.

ह्या प्रवासाला तीन तासांचा अवधी लागतो. बारी गावातून थोडे अंतर गेल्यावर श्री हनुमानाचे मंदिर येते. या हनुमान मंदिरापाठीमागून  जाणाऱ्या मार्गाने यात्री शिखरापर्यंत जाण्याचा मार्ग सुरु होतो.
तेथे या रस्त्यावर तीन लोखंडी शिड्या आहेत त्यातील शेवट्च्या शिडी लगत एक विहीर आहे परंतु उन्हाळ्यात या विहीरीचे पाणी पिण्यायोग्य नसते. बाकी उरलेल्या रस्त्यावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही त्यासाठी बारी गावातूनच पिण्याचे पाणी सोबत घेणे योग्य ठरेल. चढाईतील काही भाग वगळता बाकीचा रस्ता चढण्यास सोपा आहे.

शिखरावर तीन लोक एकावेळी बसु शकतील ऐवढे एक छोटे कळसुबाई देवीचे मंदिर आहे. शिखरावरुन भंडारदरा धरणातील पाण्याने व्यापलेला विस्तीर्ण भाग पर्यटकांचे लक्ष वेधुन घेतो. शिखराच्या उत्तरेला रामसेज, हरिहरगड, ब्रम्हगिरी, अंजनगिरी, घरगड, बहुला, त्रिंगलवाडी, कवनाई हे गड आहेत, पुर्वेला ऊंडा, विश्रामगड, बितनगड पश्चिमेला अलंग, मदनगड, रतडगड आणि दक्षिणेला पभारगड, घनचक्कर, हरिशचंद्रगड दिसतात

Friday, 3 May 2013

श्री मोहटादेवी

श्री मोहटा देवी
पाथर्डी शहरापासून पुर्वेकडे 9 कि.मी. अंतरावर असणारे पुण्य पावन श्री. क्षेत्र मोहटादेवीगड. येथील देवता श्री. कुलस्वामिनी जगदंबा मोहटादेवी ही आई जगाची आई.

श्रुती नेती नेती म्हणती गोविंद रे ।। सहास्त्र मुखाचा वर्णिता भागला ।।

वेद जाणु गेला पुढे मौनावाला ।। या न्यायाने महती कितीही वर्णन करावी तेवढी थोडीच आहे. ती आईच आहे हीच तिचीमहती.

श्री भगवान वृद्धेश्वर (म्हातारदेव) आदीनाथ गुरु सकल सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य ।। श्री भगवान मच्छिंद्रनाथांची संजीवन समाथी सावरगांव, श्री भगवान कानीफनाथांची संजीवन समाधी मढी,(श्री क्षेत्र कानिफनाथ गड) अशा पुण्यपावन भुमीमध्ये फार फार वर्षापुर्वी श्री भगवान नवनातांनी जगत कल्याणार्थ शाबरी विद्या कवित्व सिद्धीसाठी एक महायज्ञ करुन भगवती, महाशक्ती श्री जगदंबादेवीची आराधना केली. या महायज्ञास अनेक ऋषीमुनींना पाचारण केले. यज्ञाद्वारे देवदेवता संतुष्ट झाल्या. त्याचवेळी पृथ्वीवर महादुष्काळ पडला होता. यज्ञाद भवती पर्जन्यो पर्जन्याद अन्न संभवः ।। श्री भगवान श्री कृष्ण उक्ती प्रमाणे विपुल अशी पर्जन्यवृष्टी होऊन भरपूर अन्य धान्याची निर्मिती झाली. प्राण्याना चारा उपलब्ध झाला. लोक आनंदी झाले. आणि पूर्णाहूती सोहळ्याच्या वेळी यज्ञकुंडात एक दिव्यशक्ती प्रगट झाली. तेच महाशक्ती श्री जगदंबा रेणुका माता श्री नवनाथाना व तिने वरदान दिले व जगत कल्याणार्थ शाबरी विद्या कवित्वास आर्शीवचन दिले. त्यावेळी जगत उद्धारार्थ तु याच ठिकाणी रहावे अशी आईस प्रार्थना केली तेव्हा पुढे कार्य आहे हे जाणून योग्यवेळी मी येथे पुन्हा प्रगट होऊन येथेच राहील असे आर्शिवचन दिले.

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत । अभ्युत्थान मधर्मस्य संभवामी युगे युगे ।। या न्यायाने एकाच्या कैवारे उघडी बहुतांची अंतरे या नुसार मोहटा गांवच्या दहिफळे बन्सी, हरी गोपाळ, आदिच्या निमित्ताने जगत कल्याणार्थ श्री रेणुकामाता येथे प्रगट होऊन स्थानापन्न झाली. व श्री मोहटादेवी या नावाने प्रसिद्ध झाली.

तिच्या नावे श्री क्षेत्र मोहटादेवीगड प्रसिद्ध झाले.

जनमानसातील विकाररुपी, मोहादि, राक्षसांचा वध करुन मोहात अडकवून स्धर्माचे विस्मरण होत चाललेल्या माणासास जागे करुन दिव्य शक्ती, दृष्टी प्राप्त होऊ लागली. लोक जसजसे भजु लागले उपासना करु लागले तस तशी त्याची मनोकामना पूर्ण होऊ लागली. आनंदाने जगु लागले. जीवनातील अगतीकथा, नैराश्य, दुःख दारिद्र्य, क्लेश, दैर्बल्यता, नि राष्ट्रविघातक प्रवृत्ती, दैन्य नाहीसे होऊ लागले व मी सामर्थ शक्तीसंपन्न बलवाण आहे.
असा आत्मविश्वासू माणसास वाटू लागला आणि जगण्याचा यथार्थ आनंद मिळू लागला ही सारी किमया महती श्री मोहटादेवीचीच होय.

शरीराचे आणि मनाचिया रोग । न होतीहे भोग प्रारब्धाते ।।

रोगीट शरीर व मन हे आपल्याच कर्मचे फळ आहे. तो रोग आपणच नाहीसा केला पाहीजे हा प्रेष माणसास मिळू लागला. मनातील विकल्प जाऊन सत्यसंकल्पत्व प्राप्त होऊ लागले. आत्वल क्षीण झाले. नाहीसे झाले की, नाना व्याथी मनास ग्रासुन टोकतात व मनुष्यजीवंत असूनही जीवंतपणाची अनुभुती येत नाही ही अवस्था नष्ट होऊन आत्मबल प्राप्त होऊनजगत असताना जीवानंद मिळण्यासाठी प्रत्येक क्षणीशक्ती प्राप्त होते हाच श्री मोहटादेवीच्या कृपेचा नित्य अनुभव, साक्षात्कार, चमत्कार व हीच महती होय.

अनेक भक्तगणांना दृश्य स्वरुपात साक्षात्कार येऊ लागला व श्रीमोहटादेवीची महती गवोगावी पसरु लागली. श्री मोहटादेवीच्या स्वरुपाकडे पाहीले की, कितीही दुःखी असणारे मन हे प्रसन्न होते हीच पहीली अनुभूती.

म्हशीचा रंग बदलला :-

नित्य श्री मोहटादेवीची ना येथे जाऊन तीर्थ घ्यावे श्री भगवान सिद्धेश्वराचे दर्शन घ्यावे व श्री मोहटादेवीचे दर्शन घेऊन दिवसभर सदाचार संपन्नतेने राहुन सासंसरीक कर्म करावा असा दिनक्रम असताना प्रसंग असा की, एक दिवस मोहटा गावामध्ये एकदा चुकारीच्या म्हशी आल्या. चुकारीच्या आलेल्या म्हशी सांभाळून ज्यांच्या असतील ते म्हशचीचे मालक आल्यावर त्यांना देऊ अशीच त्याची इच्छा ईश्वरी लीला व वेगळीच असते. अनेक दिवस वाटपाहूनही कुणीही आले नाही. मात्र ही वार्ता मोगलांचे नाकेदार यांना कळाले व त्यांनी म्हशी चोरीचा आरोप भक्तांवर केला आणि पाचारण करुन बंदिस्त करण्याच आदेश केला. बिचार्या भक्तास खुप दुःख झाले दुःखातून मुक्त होण्यासाठी श्री मोहटादेवीची आळवणी केली. खडा पहारा केला उपवास केला व नवस केला आई यापुढे आम्ही गायी म्हशीचे दुध तुप विकणार नाही व तुला अर्पण केल्याशिवाय खाणार देखील नाही. परंतु हे संकटनिवारण कर. आम्ही कोणतीही चोरी केली नाही. भक्तांची भावना व सत्यसंकल्प पाहुन आई व श्री मोहटादेवीची कृपा झाली. ईश्वराजवळ कर्तुम, अकर्तुम अन्यथा कर्तुम अशी शक्ती असते. भक्तांचे कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे याप्रमाणे भक्त साहसी व्हावा, बलवाण व्हावा म्हणूनच भगवान प्रसंग ऊभा करत असतो व त्याचे निवारण ही करतो. दुसर्या दिवशी नाकेदार, बंदिस्त करण्यास येणार होते त्याप्रमाणे आले आणि पाहतात तर रात्रीतुन म्हशीचा काळा रंग बदलून भोरा (पांढरट) झाला. काल पाहीलेल्या ह्या म्हशी नाहीत बंदिस्ताचा हुकुम रद्द केला. ही सर्व श्री मोहटादेवीची लीला आहे असे वर्णन सर्वांनी केले नाकेदारासह भक्तांनी श्री मोहटादेवीचे दर्शन घेतले. तेव्हापासून आजपर्यत दहिफळे घराण्यातील लोक दुध तुप विकत नाहीत व देवीस अर्पण केल्याशिवाय कात नाहीत. बादशहाच्याही कानी ही वार्ता नाकेदाराकडून कळली उपासना भाग; भिन्न असल्यातरी तत्व एकच आहे. शक्ती एकच आहे. नीतिमत्ता, ही सर्व धर्माचीच शिकवण आहे आणि यातील कार्य करणारी शक्ती म्हणजेच श्री जगदंबा देवी आहे. भेदाभेद सर्व अमंगल ।। अशी बादशहाची वृत्ती पालटली व भ्रम दुर झाला नाकेदारास बढती देऊन श्री मोहटादेवीस विपूल द्रव्यदान दिले सर्वजन आनंदाने श्री मोहटादेवीची महती गाऊ लागले. ही वार्ता सर्वदूरजाऊन देवीची प्रसिद्धी होऊ लागली.
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच अशी विश्वासपुर्वक बलयुक्त लोकमान्यटिळकांची प्रतिज्ञा व हजारे महान असे बळवीर म.गांधी, विं.दा. सावरकर, मंगल पांडे, भगतसिंग आहे. स्वातंत्र्यासाठी जीवापाड संघर्ष करत होते. श्री. समर्थ रामदास स्वामी, श्री. संत तुकाराम महाराजादि संत महात्म्ये जन जागृती करत होते काळामध्ये मनुष्यास स्वधर्माचे विस्मरण होत चालले होते. मोह पाशात अडकून मनुष्य पारतंत्र्यास जणू स्वातंत्र्य मानू लागला होता.

या मोहग्रस्त बिकट काळामध्ये, दंडकारण्यप्रदेशी श्री भगवान नवनाथादि संत महात्म्यांच्या पुण्यपावण प्रदेशी श्री छत्रपती शिवरायांना स्वराज्यासाठी प्राणपणाला लावणारे खंबीर बलाढ्य कर्तव्यदक्ष शुरवीरंच्या क्षेत्री, गोदावरी सारख्या पुण्यनदीच्या परीसरात शांतीब्रम्ह श्री एकनाथ महाराजांच्या कृपा छायेमध्ये श्री भगवान वृद्धेश्वर, श्री भगवान मच्छिंद्रनाथ , श्री भगवान कानीफनाथ, श्री भगवान गहिनीनाथ, श्री भगवान जालींदरनाथ, श्री. भगवान नागनाथ यांचे कृपाछत्र आहे. अशा प्रदेशात मनुष्य मोहग्रस्त झाला तर स्वप्रगती, राष्टोद्धार, आत्मोन्नती, जीवनानंद संपुण जाईल व मोठा विनाश ओढवेल. जन्मास येण्याची ही योग्य वेळ योग्य स्थळ आहे श्री क्षेत्र माहुरगडवासिनी आई रेणुकामातेने जाणले आणि लेकरांसाठी श्री मोहटादेवीच्या रुपाने अवतिर्ण झाली.

भाविक भक्तांनो,

मोहटागाव व परिसरातील लोक श्री माहुरगड निवासिनी रेणुकामातेची भक्ती निष्ठापुर्वक करत असत. त्या काळामध्ये माहुरला जाण्यासाठी पायी मार्गच असे. पायी दिंडी यात्रा निघायची. साहित्यासाठी बैलगाडी असायची. दररोज पहाटेच उठावे. भूपाळी भावगीत प्रार्थना म्हणावी. सुर्यनमस्कार, व्यायाम, ध्यान, धारणा करावी. स्नान करुन श्री रेणुकामातेची पुजा करावी. नित्य सदाचाराने संस्कृती संपन्न जीवन जगावे व लहानांना आचरणातून धर्म शिकवावा. असाच त्यांचा नित्यनेम. मोहटागावापासून माहुरगडहुन परत गांवी येण्यास जवळपास दोन महिन्यांचा कालावधी लागायचा. आईचे आशिर्वाद घेऊन पुन्हा आपल्या गावी येऊन व्यवसाय करावा.

आधि प्रपंच करावा नेटका मग परमार्थ सुभटा या श्री समर्थ उक्तीनुसार धन्य तो ग्रहस्थाश्रमः या न्यायाने संसार करावा. संसार सोडून परमार्थ केला अन्न मिळेना खायला अहो कैसा करंट्याला परमार्थ कैसा अशी संसाराची विफलता होणार नाही याची काळजी घ्यावी व जीवनाला परम अर्थ प्राप्त व्हावा असे वागावे असे ते देविभक्त

जोडोनिया धन उत्तम व्यवहारे । उदास विचारे वेच करी ।।

अशा पद्धतीने धनाचा विनियोग करणारी ती माणस. त्यामुळे त्यांच्याजवळ दैवीगुण संपत्ती टिकुन होती. तर दुसरीकडे समाजामध्ये इंग्रजी वाढती सभ्यतेच्या व मोगलराजवटीच्या मनुष्य अडकू लागला व मोहरुपी पाशांत बांधला जाऊ लागला व भिकाररुपी राक्षसी वृत्ती वाढू लागली.
संमोहात विभ्रमः ।। या मोहादि विकारामुळे बुद्धी मालिन्य, अस्थिरपणा, उदासमनोवृत्ती, निष्क्रियता, आत्मवंचकता अगतिका आदि दुर्गुण व दुरावस्था प्राप्त होते व विनाशाकडे मनुष्य जाऊ लागतो. म्हणूनचा श्री भगवती श्री भगती रेणुकामातेने श्री मोहटादेवीच्या रुपाने अवतार धारण करुन या विकाररुपी मोहरुपी राक्षसाचा वध करुन समाजास दिव्यदृष्टी शक्ती, बुद्धि देण्याचे कार्य केले.

अनेक वर्ष वारी करणारे मोहटागाव व परीसरातील भक्त गणामधील हरी गोपाल, बन्सी दहिफळे या वृद्ध भक्ताने आर्ततेने देवीची प्रार्थना केली. आई शरीर थकले आहे. पायी वा बैलगाडीतून देखील तुझ्या भेटीला येणे शक्य वाटत नाही. तुझा वियोग तर असाह्य होतो. आई तु आम्हास सोडू नको आई, आई असे म्हणून डोळे भरुन आले. तोंडातून शब्द बाहेर पडेनासे झाले व मौनेची करावा नमस्कार दोन्ही हात तिसरे मस्तक यांनी साष्टांग नमस्कार केला.

देव भावाचा मुकेला हाचि दुष्काळ तयाला ।।

भक्त मंडळी शांत झोपी गेली. पहाटेच्या सुमारास भक्तांस दृष्टांत झाला. बाळा, ती तुझ्या बरोबरच आहे. घाबरुन नकोस. विश्वास ठेव मी सर्वत्र आहे. हे शब्द जाग आली तर समोर कुणीच नाही. पुन्हा तोच आवाज तेच शब्द.

दुसर्या दिवशी पुन्हा दृष्टांत व शब्द ध्वनी ऐकताच दिव्य मुर्ती समोर सारया भक्तांचे डोळे दिपले. भव्य प्रकाश साध्या डोळ्यांना पाहावत नव्हता पुन्हा तोच ध्वनी कानांवर. भक्तांचे देहभान हरपले. भावसमाधीतून भानावर आले व सर्वांना महान असा आनंद झाला. व जीवनात नवचैतन्य निर्माण झाले. नामस्मरण करीत मोहटागाव जवळ करु लागले व आई कुठे पुन्हा भेट देईल या क्षणाची स्थळाची वाट पाहु लागले.

भक्तांच्या बरोबर दैवीगुणसंपन्न अशी एक पांढरी शुभ्र नित्यदुध देणारी गाय होती. ती गाय अचानक धावत निघाली ती पुन्हा शोध घेऊनही सापडलीच नाही. यात्रा मुक्काम करीत, दिनक्रमाने नित्योपासना करीत चालू होती. एक दिवस यात्रेतील भक्तांनी बाबांना विचारले बाबा, देवी आपल्याबरोबर आहे मग दिसत का नाही, बोलत का नाही. बाबांनी उपदेश केला, अरे वेड्या कलियुगात भगवंताने मौन धरले, बैद्ध अवतार धारण करुन विटेवर उभा राहुन तो दिव्य शक्तीने भक्तांचे पालन पोषण करतो.

केवळ दिसते तेच सत्य असते काय ? हवा दिसत नाही मग हवा नाही काय ? सुगंध दिसत नाही मग नाही का ? पहाणे हा डोळ्याचा विषय, वास घेणे हा नाकाचा विषय ? नाक दाबले की हवेची सुगंधाची, दुर्गधाची इनुभुती येते व हवा आहे सुगंध आहे हे कळते. साध्या डोळ्यास जे दिसत नाही त्यासाठी भिंगाचा उपयोग करतात.
तसा देव हा अनुभवाचा विषय आहे व तो पाहण्यासाठी दिव्यदृष्टी लागते. दुर्लभ असे वाघीणीचे दुध प्राप्त झाले तर घेण्यासाठी सोन्याचे भांडे लागते. तसा भक्तांच्या ठिकाणी अंतःकऱणाचे योग्य पात्र झाले की, मनुष्य ओळखू येतो, त्यानंतर साधु ओळखता येतो व मग देव कळतो.

मातृदेवोभव, पितृदेवोभव, आचार्य़देवोभव, अतिथिदेवोभव ह्या पायरया चढल्या की मंदिरातील आईचे दर्शन होते असा उपदेश केला नित्य कथा, कीर्तन, नृत्य, गीत गायन करती यात्रा मोहटागावी पाहोचली. पुन्हा पहाटे तोच दृष्टांत तो ध्वनी आवाज बाळा, अरे तुमच्या बरोबरच गावी आले.

सकाळी गुराखी मुलांनी गुरे सोडली व वनात चरण्यास घेऊन गेली तर उंच डोंगराच्या पायथ्याशी एक तेजसंपन्न सुंदर स्त्री दिसली मुले जवळ जातात तो ती गुप्त झाली. मुले भयभयीत झाली. काहीमुले उंच डोंगरावर गेली तर त्यांना यात्रेतून पळून गेलेली पांढरीशुभ्र गाय पहावयास मिळाली. ही वार्ता मुलांनी गावात येऊन सांगितली. श्री. भगवान सिद्धेश्वरनजीक गावालगत ओढा असून त्या ठिकाणी एक ढोह आहे. सुंदर तेजपुंज स्त्री स्नान करीत आहे. असे पहाटच्यावेळी पाणी आणण्यासाठी गेलेल्या काहीसुवसिंनी स्त्रिया यांना दिसून आले. आजी, कुठल्या तुम्ही ? अग मी याच गावची आहे. तुमच्यासाठीच मी इथे रहाते; असे सांगितले आणि पहाता पहाता ती म्हतारी गुप्त झाली. ही वार्ता संपुर्ण गावात कळाली जो तो विचार करु लागला. सारा गावा श्री सिध्देश्वराजवळ जमला. देवीची प्रार्थना करु लागला. दहिफळे बाबांना भावसमाधी लागली. एवढ्यात कानांवर पुन्हा आवाज माझ्या पाडसांनो, मी तुमच्यासाठी माहुरगडांवरुन आले. उंच डोंगरावरुन गाईने हंबरडा फोडला. सारा गाव धावत धावत आई श्री. रेणुकामातेची गर्जना करीत करीत उंच डोंगरावर पोहचला आणि पाहतात तो जिथे गाय उभी त्याच ठिकाणी भव्य, दिव्य तेजपुंज असा शेंदराचा तांदळा. श्री भगवान परशुरामांसाठी जशी माहुरगडांवर श्री रेणुकामाता प्रगट झाली तशी मोहटा गावच्या परशुरामासाठी आई श्री रेणुकामाता प्रगट झाली. सर्वभक्तगणांचे मन आनंदाने भरभरुन आले. गाय नाचे उडे आपुलीया छंदे । आनंदू रे आजि आनंदुरे । अशी अवस्था झाली सर्वजन आनंदोत्सव साजरा करु लागले व श्री मोहटा देवीचे दर्शन करु लागले एवढ्यात झोपेतून कुणी हालवून जागे करावे तसा आवाज आला, अरे उठ जागा हो, विकाररुपी राक्षसाचा वध करुन स्वधर्म संस्थापनेसाठी मी येथे प्रगट झाले, सर्व जण सर्व इंद्रियांचे कान करुन तो आवाज ऐकत होते व श्री मोहटादेवीकडे टक लावून पहात होते. पुन्हा तोच तोच आवाज ऐकु यायचा सर्वांना महत आश्चर्य़ वाटले दिव्यशक्तीची अनुभूती आली आणि सर्वभक्तागणांनी साष्टांग दंडवत घेतले व आइची प्रार्थना केली आई ग आम्हांस सांभाळ.
तो पुण्य पावन दिन म्हणजे आश्वीन शु. 11 म्हणुनच या दिवशी लाखोंच्या संख्येने भावीक श्री क्षेत्र मोहटादेवी गडावर येतात व आनंदोत्सव साजरा करुन श्री मोहटादेवीचे दर्शन घेतात.

ती प्रथम मोहाच्या झाडाखाली दिसली म्हणुन मोहस्थिमाता, उंच डोंगरावर प्रगट झाली तिच जागृत, स्वयंभू, नवसासपावणारी, विकारुपी मोहरुपी वध करणारी, त्रिगुणात्मिका, श्री क्षेत्र माहुरगड निवासिनी श्री रेणुकामाता प्रगट झाली तिच मोहटाग्राम निवासीनी श्री मोहटादेवी होय. तिच्याच नांवे श्री क्षेत्र मोहटादेवी गडाची स्थापना झाली व प्रसिद्धी झाली.

या दिव्यांनंदामुळे मोहटागांव व परिसरातील भावीक भक्तांनी भक्तांच्या सोयीसाठी, नित्योपासना पुजा अर्चादी विधीसाठी भव्य, दिव्य, कलासंपन्न असे दगडी मंदीर उभारणीचा संकल्प केला आणि मंदीर शिखरासहीत श्री मोहटादेवीच्या कृपेने पूर्ण झाले.

उपासना भक्ती पूजामद्ये ध्यानमग्न असणार्या भावीक भक्तांना श्री मोहटादेवीचा साक्षात्कार होऊ लागला, कृपेची नित्य अनुभूती येऊ लागली व मोहटागांव व परिसरामध्ये गांवोगांवी ही वार्ता पसरु लागली आणि भावीकांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली. नवसाच्या माध्यमाने द्रव्य रुपात, वस्तु, धान्य स्वरुपात देणगी जमा होऊ लागली व ग्रामस्थांनी भव्य मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला. मानवी जीवनामध्ये इतर व्यक्तीकडून एखादे काम झाले मदत झाली तर कृतज्ञता म्हणून मनुष्य उपकाराची वाहवा करतो, सामाजीक उद्धार, राष्ट्रोद्धार कार्य झाले मनुष्य अशा महान राष्ट्रोद्धार करणार्या व्यक्तींचा जयजयकार करतो

ओम नमोजी आद्या वेदप्रतिपाद्या जय जय स्ववंवदेया आत्मारुपा । माऊली ज्ञानदेवाने नमन करुन स्वंवेद्य आत्मरुपाचा जयजयकार केला व हृदयमंदिरात पूजा केली. यानुसारच दिव्यांनंदाने भक्तगणांनी मंदीर उभारणीचे कार्य सुरु केले व दिसेल ते काम करु लागले.

गडावर येण्यास निकटमार्ग. निश्चयात्मक श्रद्धायुक्त अंतःकरण असल्याने महत कष्टाने खाणीद्वारे मोठ मोठे दगड माढून, उत्तम कलासंपन्न दगडी खांब, चीरे कमान, इ. निर्माण करुन चार चौघांनी एकत्र येऊन खांद्यावर घेऊन गडावरती आणले. उत्तम कारागीराकडून काम सुरु झाले. आणि पाहता पाहता दीपमाळ, सभामंडप, प्रवेशद्वार, यासह मंदिराची ऊभारणी होऊन विविध देवदेवता, साधसंत यांच्या मुर्तीसह उंच असे शिखरासह मंदिराचे बांधकाम श्री. मोहटादेवीच्याच कृपाशिर्वादाने पूर्ण झाले.

श्री भगवान जगदगुरु ज्योषपीठाचार्य 1008 श्री शंकराचार्य़ महाराज यांच्या परमपावन शुभहस्ते अनेक साधुसंत महात्म्याच्या उपस्थितीत अध्यक्षांसह व्यवस्थापन समिती, कर्मचारी वृंद व ग्रामस्थ, हजारो भावीक भक्तांच्या मेळाव्यामध्ये शास्त्रविधीवत कलशारोहन कार्यक्रम श्री मोहटादेवीनेच करुन घेतला.


सौजन्य - http://www.shrimohatadevi.org/

Wednesday, 1 May 2013

अहमदनगर भुईकोट किल्ला



१८०३ साली अहमदनगर किल्ला हा दिसायला आकाराने अंडाकृत असून किल्ल्याला एक मोठा (मुख्य) दरवाजा, चौविस बुरुज आणि तीन छोटे मार्ग आहेत. किल्ल्याच्या चहुबाजुंनी एक खंदक आहे जे १८ फुट रुंद, ९ फुटापर्यंत पाण्याने भरलेले (सध्या कोरडे) असे. किल्ल्याच्या बुरुज काळ्या पाषाणचे आणि काही ठिकाणी विटांच्या भिंती आहे.  बुरुजाच्या भिंती केवळ ४॥ फुट उंच असून ते गोल आहे. त्यातील एका बुरुजावर पुर्वच्या दिशेने आठ बंदुका होत्या आणी बाकी बाजुनीं जंगल होते त्यामुळे त्यांवर बंदुका नाहीत. १८१३ साली प्रत्येक बुरुजावर दोन बंदुका ठेवण्यात आल्या आणि आक्रमण काळात २०० बंदुका तयार असत.

निजाम शाही राजवंशातील प्रथम सुलतान मलिक शाह अहमद याने १४२७ साली  शेजारील शत्रुच्या आक्रमणापासुन शहरची रक्षा करण्यासाठी हा भुईकोट किल्ला बांधला. सुरुवातीला किल्ला मातीचा वापर करुन बनवण्यात आला होत परंतु नंतर १५५९ साली हुसैन निजाम शाहने मुख्य बुरुजाचे काम सुरु केले ते चार वर्षे चालले आणि १५६२ साली पुर्ण झाले. राजरानी चांदबीबी १५९६ सालचे मुगल आक्रमण यशस्वीरित्या परतवले परंतु १६०० साली अकबरने हा किल्ला जिंकला आणि तो मुगल साम्राजात शामिल करुन घेतला. औरंगजेबाचा वयाच्या ८८ व्या वर्षी किल्ल्यात २० फेब्रुवारी १७०७ ला मृत्यु झाला. औरंगजेबाच्या मृत्युनंतर पेशव्यांनी मुगलांकडुन किल्ला विकत घेतला आणि मराठा सरदार शिंदे यांच्याकडे सुपुर्द केला. मराठा साम्राजात माधरावांच्या मृत्यु नंतर आलेल्या अथ्तिरतेच्या काळात किल्ला दौलत शिंदे यांच्याकडे होता. १७९७ साली नाना फडणवीस येथे कैदेत होते.

दुसऱ्या एग्लो मराठा युध्दादरम्यान आर्थर वेलेसलेय याने मराठांचा युध्दात पराभव करून किल्ला ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात घेतला. ब्रिटीश राजवटीत या किल्ल्याचा उपयोग कैद्याचे तुरंग म्हणुन केला जावु लागला.  

येथे जवाहरलाल नेहरु, अबुल कलाम आज़ाद, सरदार पटेल, डॉ. पी.सी. घोष आणि इतर कांग्रेस नेता येथे तीन वर्षे तुरुंगवासात होते. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी याच किल्ल्यात लिहिला. या ग्रंथाची काही हस्तलिखिते आजही येथे पाहण्यास मिळतात. याच किल्ल्यात डॉ. पी.सी.घोष यांनी हिस्ट्री ऑफ एन्शंट इंडियन सिव्हिलायझेशन हा ग्रंथ शब्दबद्ध केला. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी थॉट्स ऑफ पाकिस्तान व मौलाना आझाद यांनी गुबार - ए - खातिर हे ग्रंथ याच शहरात लिहिले.

सध्या भुईकोट किल्ला भारतीय सैन्य दलाच्या स्वाधीन आहे